धाराशिव नगरपरिषद निवडणुकीत मोठा वाद पेटला आहे. Dharashiv 2.0 या सोशल मीडिया अकाउंटवरून मतदानापूर्वी बोगस एक्झिट पोल टाकल्याचा आरोप शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने केला आहे. या प्रकारामुळे मतदारांमध्ये संभ्रम निर्माण झाला आणि प्रशासनाच्या निष्क्रियतेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत. शिवसेना (उबाठा) पक्षाचे तालुकाप्रमुख राकेश सूर्यवंशी यांनी या घटनेवर थेट संताप व्यक्त केला आहे. त्यांनी सांगितले की Dharashiv 2.0 या सोशल मीडिया अकाउंटवर टाकलेला फेक एक्झिट पोल मतदारांना दिशाभूल करण्याचा प्रयत्न होता, आणि संबंधित सोशल मीडिया अकाउंटवर कोणतीही तातडीची कारवाई न होणे हे गंभीर मुद्दा आहे.
जिल्हाधिकाऱ्यांना स्वयंस्पष्ट अहवाल सादर करण्याचे आदेश
सूर्यवंशींनी जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांना लेखी तक्रार दिली, ज्याला जिल्हाधिकाऱ्यांनी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे पुढे पाठवण्यात आली मात्र अद्याप पर्यंत या संदर्भात कोणतेही कारवाई करण्यात आली नाही.
सूर्यवंशींनी या प्रकरणाची तक्रार निवडणूक आयोगाकडेही मेलद्वारे पाठवली, ज्यावर आयोगाने तात्काळ प्रतिसाद देत जिल्हाधिकाऱ्यांना स्वयंस्पष्ट अहवाल सादर करण्याचे आदेश दिले. राकेश सूर्यवंशींचा सवाल आहे की निवडणूक आयोगाला हा गंभीर गुन्हा दिसतो, पण स्थानिक प्रशासनाला का दिसत नाही? असा सवाल राकेश सूर्यवंशी यांनी उपस्थित केला आहे.
तीन वर्षांपर्यंत तुरुंगवास आणि दंडाची तरतूद
भारताच्या Representation of the People Act, 1951 – कलम 126A नुसार, मतदान सुरू होण्यापूर्वी किंवा मतदान चालू असताना कोणताही एक्झिट पोल, मतदारांचा अंदाज किंवा कोण जिंकणार यावरील सर्व्हे प्रकाशित करणे गुन्हा ठरतो. या उल्लंघनासाठी तीन वर्षांपर्यंत तुरुंगवास आणि दंडाची तरतूद आहे. त्यामुळे Dharashiv 2.0 पेजवर टाकलेला फेक पोल हा थेट कायद्याचा भंग करणारा गंभीर प्रकार मानला जातो.
हेतू साध्य झाल्यावर पोस्ट हटवणे म्हणजे अपराधाची कबुली – राकेश सूर्यवंशी
दरम्यान पुढे बोलताना राकेश सूर्यवंशी म्हणाले की, फेक पोल नंतर हटवला गेला असला तरी, सूर्यवंशींचा आरोप आहे की हे हेतू साध्य झाल्यानंतरच केले गेले, ज्यामुळे पोल टाकणाऱ्यांच्या उद्देशाची स्पष्टता दिसते. ते म्हणाले, “हेतू साध्य झाल्यावर पोस्ट हटवणे म्हणजे अपराधाची कबुली आहे. लोकांची फसवणूक करून पोल काढला म्हणजे पाप धुतले जात नाही.” सूर्यवंशी यांनी प्रशासनाला इशारा दिला की, जर Dharashiv 2.0 वर तातडीने कारवाई झाली नाही, तर ते रस्त्यावर उतरून आंदोलन करण्यास तयार आहेत. शहरभर नागरिक आणि पक्ष कार्यकर्त्यांमध्ये प्रश्नचिन्ह वाढले आहे: Dharashiv 2.0 च्या पाठीशी कोणाचा हात आहे, आणि प्रशासन इतकी शांतता का बाळगते? संपूर्ण प्रकरणातून स्पष्ट झाले आहे की Dharashiv 2.0 चा फेक एक्झिट पोल निवडणूक प्रक्रियेवर थेट आघात करणारा प्रकार असून, प्रशासनाची निष्क्रियता आणि पोल हटवण्याची विलंबित पद्धत लोकशाही प्रक्रियेवर प्रश्न निर्माण करणारी ठरली आहे.











